।।श्री राम समर्थ श्री राम ।।
ओव्या:
म्हणौनि देव वोळखावा। जन्म सार्थकचि करावा।
न कळे तरी सत्संग धरावा। म्हणिजे कळे ।।१५।।
जो जाणेल भगवंत। तया नाव बोलिजे संत।
जो शाश्वत आणि अशाश्वत। निवाडा करी ।। १६ ।।
मराठी अर्थ:
म्हणून याच कारणासाठी देवाचा साक्षात्कार करून घ्यावा व जन्मास आल्याचे सार्थक करावे. आता याकरिता काय करावे हे जर कळत नसेल तर सत्संग (आत्मसाक्षत्कार झालेल्या सत्पुरुषांचा सहवास) धरावा, त्यामुळे कळू लागेल. (१५)
जो भगवंताला प्रत्यक्ष जाणत असतो तोच संत असे म्हटले आहे. तोच फक्त शाश्वत (अक्षय, कमीजास्त न होणारे) आणि अशाश्वत (नाशिवंत) हे वेगवेगळे करू शकतो. (१६)