।।श्री राम समर्थ श्री राम ।।
ओव्या:
ऐसें जयापासीं ज्ञान। तोचि जाणावा सज्जन।
तयापासीं समाधान। पुसलें पाहिजें।। २४।।
अज्ञानास भेटतां अज्ञान। तेथें कैंचें सांपडेल ज्ञान।
करंट्यास करंट्याचे दर्शन। होतां भाग्य कैंचें ।।२५।।
मराठी अर्थ:
असे ज्ञान ज्याच्याजवळ असेल तोच खरा सज्जन असतो आणि त्याच्यापाशी जाऊनच समाधानाचा शोध घेतला पाहिजे. (२४)
अज्ञानी माणसाकडे जर दुसरा अज्ञानी मनुष्य ज्ञानप्राप्तीकरता जाईल तर ज्ञान कसे मिळेल बरे?
करंटा (दुर्भागी, कमनशिबी) मनुष्य जर दुसऱ्या करंट्यापाशी गेला तर त्याचे भाग्य कधी उजळेल काय? (२५)