Sunday, 14 January 2024

दशक ६ : समास १ : देवशोधन (ओव्या ३ ते ५)

।।श्री राम समर्थ श्री राम ।।


ओव्या :

म्हणौन ज्यास जेथें राहाणें । तेणें त्या प्रभूची भेटी घेणें।
म्हणजे होये श्र्लाघ्यवाणे । सर्व कांहीं ।। ३ ।।

प्रभूची भेटी न घेतां । तेंथें कैंची मान्यता ।
आपुलें महत्व जातां । वेळ नाहीं ।। ४।। 

म्हणौनि रायापासूनि रंक । कोणी येक तरी नायेक । 
त्यास भेटणें हा विवेक । विवेकी जाणती ।। ५।।  


मराठी अर्थ :

म्हणनूच ज्याला जिथे राहायचे असेल त्याने तिथल्या प्रमुख अधिकाऱ्याची भेट घेऊन आपला हेतू सांगून जर तिथे राहिला तर मग तिथला त्याचा रहिवास निर्वेध  होतो. (३ )

तशी भेट न घेता राहिल्यास ते राहाणे अनधिकृत ठरेल व मान्यता नसल्यामुळे आपले महत्व उरणार नाही. (४)

म्हणून कुणी एक जो मुख्य अधिकारी असेल, त्याला भेटणे आवश्यक असते, मग तो राजा असो व सामान्य नागरिक असो. जो विवेकी (सारासार विचहर करणारा) असतो तोच फक्त ही गोष्ट जाणतो. (५)

Share: