।।श्री राम समर्थ श्री राम ।।
ओव्या :
म्हणौन ज्यास जेथें राहाणें । तेणें त्या प्रभूची भेटी घेणें।
म्हणजे होये श्र्लाघ्यवाणे । सर्व कांहीं ।। ३ ।।
प्रभूची भेटी न घेतां । तेंथें कैंची मान्यता ।
आपुलें महत्व जातां । वेळ नाहीं ।। ४।।
म्हणौनि रायापासूनि रंक । कोणी येक तरी नायेक ।
त्यास भेटणें हा विवेक । विवेकी जाणती ।। ५।।
मराठी अर्थ :
म्हणनूच ज्याला जिथे राहायचे असेल त्याने तिथल्या प्रमुख अधिकाऱ्याची भेट घेऊन आपला हेतू सांगून जर तिथे राहिला तर मग तिथला त्याचा रहिवास निर्वेध होतो. (३ )
तशी भेट न घेता राहिल्यास ते राहाणे अनधिकृत ठरेल व मान्यता नसल्यामुळे आपले महत्व उरणार नाही. (४)
म्हणून कुणी एक जो मुख्य अधिकारी असेल, त्याला भेटणे आवश्यक असते, मग तो राजा असो व सामान्य नागरिक असो. जो विवेकी (सारासार विचहर करणारा) असतो तोच फक्त ही गोष्ट जाणतो. (५)